Posts

288 मतदारसंघाच्या आढाव्यासाठी पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

Image
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा आढावा ; मुंबईत बोलावली तातडीची बैठक मुंबई  ( प्रतिनिधी )– विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील 288 विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख आणि उपसंपर्कप्रमुख यांची तातडीने बैठक बोलावली आहे. उद्या शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. ‘आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.य होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केला. आम...

पाण्याच्या दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक सोयगाव नगर पंचायतीवर.......

Image
सोयगाव शहराच्या प्रभाग चार मध्ये कमी दाबाने तर इतर प्रभागात मात्र जास्तीचा पाणी पुरवठा  दुजाभावावर जाब विचारण्यासाठी नागरिक नगर पंचायतीवर.......        सोयगाव,(प्रतिनिधी ):    शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये हेतुपुरस्कर कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येवून या प्रभागाचाय तुलनेने उर्वरित प्रभागांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो असा दुजाभाव का याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून लेखी निवेदन दिले.          दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,कि शहरतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये संबंधित पाणी पुरवठा कर्मचारी कमी दाबाने केवळ दहा मिनिटे पाण्याचा पुरवठा करत असतो,उर्वरित प्रभागांना मात्र पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.त्यामुळे याप्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी दुजाभाव का असा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढून निवेगन दिले आहे.संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर दिलीप चौधरी,दिन...

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला

Image
वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निरोगी व पोषणयुक्त आहार गरजेचा... सोयगाव( प्रतिनिधी ) गरोदर पणात वाढत्या   गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेने निरोगी पोषणयुक्त आहात गरजेचा आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ  विद्या पवार  कंक्राळा येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी  एकात्मिक बालविकास योजना व संजय शहापुरकर  यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा येथे महिला व  किशोरवयीन  युवती   यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  प्रसंगी  बोलतांना डॉ विद्या पवार यांनी सांगितले की मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवे असते गर्भवती राहिल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब  व रक्त तपासणी   करून वेळेवर लसीकरण करावे असे सांगितले या नतर  संजय  शहापुरकर  यानी  सांगितले की कुपोषण चा उगम थांब वन्या साठी गर्भवती  महिला सशक्त असणे गरजेचे आहे  त्या साठी दर महिन्याला मोफत  आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या नंतर या महिलाना ...

सोयगाव नगर पंचायत,प्रचाराची धुमाळी सुरु, सौ इंगळे व तडवी यांनी हा केला दावा

Image
सोयगाव नगर पंचायत,प्रचाराची धुमाळी सुरु, सौ इंगळे व तडवी या दोघांचाही विजयाचा दावा ======================       सोयगाव, ( प्रतिनिधी )     सोयगाव नगर पंचायतीच्या एका जागेसाठी दि.२३ मतदान होवू घातले असून एका जागेसाठी प्रभाग क्रमांक-१६ साठी दोन उमेदवार रिंगणात आहे.त्यामुळे प्रचाराची रंगत वाढली असल्याने या पोट निवडणुकीत अचानक रंग राजकीय भरला आहे.           नगर पंचायतीच्या एका जागेसाठी भारती इंगळे(शिवसेना)आणि सिकंदर तडवी(अपक्ष)हे दोन उमेदवार रिंगणात असून दोघांनीही विजयाचा दावा केल्याने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी चुरस वाढली आहे.दरम्यान या एका जागेवर शहराच्या नगराध्यक्ष पदाची धुरा अवलंबून असल्याने एका जागेची लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.दरम्यान भाजपच्या ताब्यातून नुकतेच शिवसेनेने ऐनवेळी झालेल्या निवड प्रक्रियेतून नगराध्यक्ष पद ताब्यात घेतले असल्याने नगराध्यक्ष पद कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून अपक्ष उमेदवार विजयी झाल्यास शहराच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोयगावला निवडणुकीपूर्वी राजकीय वात...

वाढदिवसानिमित्त छत्रपती मल्टीस्टेट चेअरमन संतोष भंडारी यांनी लावली झाडे

Image
छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा =========================== गेवराई ( प्रतिनिधी ) येथील छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन युवा उद्योजक संतोष भंडारी यांचा वाढदिवस वृक्षारोपनासह विविध सामाजिक उपक्रमाने गेवराईत उत्साहात साजरा करण्यात आला.                 छत्रपती मल्टीस्टेट च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर  राज्यातील अनेक जिल्ह्यात  शाखा स्थापन करून  तरुणांना नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या  चेअरमन संतोष भंडारी  यांनी  विविध  उपक्रम राबवून आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे  त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग  मोठ्या प्रमाणात  त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो परंतु यावर्षी दुष्काळाची दाहकता लक्षात घेता,  छत्रपती परिवाराच्या वतीने परीसरात चेअरमन संतोष भंडारी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आरतीताई भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मुक बधीर शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना...

सोयगावला उन्हाचा फटका,पाउसच नसल्याने कपाशी पिके होरपळली........

Image
सोयगावला उन्हाचा फटका,पाउसच नसल्याने कपाशी पिके होरपळली........ ========================        सोयगाव,ता.१५(बातमीदार):     मृग नक्षत्रातही सोयगाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढती झाल्याने आठवडाभरापूर्वी लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांची कोवळी अंकुर पाण्याआभावी होरपळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ठिबक सिंचनवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांना पावसाची गरज असतांना ऐन मृगाच्या नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने मृग कोरडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.           कपाशी लागवडीत असलेल्या सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांनी बाळसे धरले आहे,परंतु या कोवळ्या अंकुरांना पहिल्या पाण्याची आवशकता असतांना,पावूस कोसळत नसल्याने पिकांची वाढीच्या काळातच स्थिती खराब झाली आहे विहिरींचा पाणीसाठा जेमतेम असल्याने ठिबक सिंचनवर तीन दिवसातून दोनवेळा पाणी भारती करण्याची स्थिती आहे.त्यातच उन्हाची तीव्रता कमी होत नसल्याने पिके चिंताग्रस्त झाली आहे.मृगच्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. .............................
Image
विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाही तर शाळा भरणार कशा ? गेवराई तालुक्यातील शिक्षक व पालकांसमोर मोठा प्रश्न ==================== टँकरने पाणी द्या, नसता सुट्टी वाढवावी लागेल ==================== गेवराई ( प्रतिनिधी  ) दुष्काळाची गंभीर स्थिती असलेल्या गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात प्यायलाच पाणी नाही. अशा स्थितीत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून सोमवारी दिनांक  17 जून रोजी सर्व शाळा सुरू होणार आहेत. परंतु  ग्रामीण भागातील बहुतांश शाळेत  प्यायला पाणीच नाही, मग शाळा भरवायची कशी ? असा प्रश्न  शिक्षक  व पालकांसमोर निर्माण झाला आहे.         गेल्या चार वर्षापासून अत्यंत कमी पाऊस झाल्याने गेवराई तालुक्यामध्ये पिण्यास पाणी नसल्याने, दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सद्या गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने दररोज जवळपास दोनशे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अनेक गावात टँकरची एकच फेरी होत असल्याने शेकडो नागरिक, महिला रात्रंदिवस या टँकरची वाट पाहत बसलेले असतात. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये तर प्यायला पाणीच उपलब्ध ...

गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार ; शहरात चोट्टे करतायत राज्य

Image
गेवराईत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार शहरातील ग्राहकांचे भवितव्य चोट्यांच्या हातात ==================== पावसाळ्याआधीच अनेक लाईनमन नॉट रीचेब ==================== गेवराई ( प्रतिन) दुष्काळात आणि कडक उन्हाळ्यात घरोघर जाऊन लाईट बिलाची वसुली करणारे लाईनमन, सध्या मात्र पावसाळ्या आधीच गेवराईतून नॉटरिचेबल झाले आहेत. शहरातील लाईट वेळोवेळी खंडित होत असून, अनेक ट्रान्सफार्मर मधील फ्यूज सतत उडत आहेत. यातून विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शहरातील विद्युत ग्राहकांचे भवितव्य मात्र चोरट्यांच्या हातात गेल्याचे दिसत आहे.             याबाबत अधिक माहिती अशी की, अद्याप पावसाळा सुरूही झाला नाही त्या अगोदरच, गेवराई शहरातील अनेक लाईनमनचे मोबाईल नॉटरिचेबल झाले आहेत. तर काही जणांचे मोबाईल सुरू असले तरी ते ग्राहकांचे कॉल घेत नाहीत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेवराई शहरातील अनेक ट्रांसफार्मर मधील फ्युज सतत उडत आहेत. 90 टक्के वसुली असलेल्या भगवान नगर या भागातील ट्रांसफार्मर मधील फ्युज तर नेहमीच उडत आहे. त्यामुळे विद्युत पुर...

शिवसेना सोशल मीडियावर दादासाहेब खरात, सचिन पंडित व पिंटू काळेंची निवड

Image
शिवसेना गेवराई तालुका सोशल मीडियाच्या उपप्रमुखपदी दादासाहेब खरात व सचिन पंडित ==================== तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेनेच्या  गेवराई तालुका सोशल मीडिया कार्यकरण्याची नुतन पदाधिकाऱ्यांची दिनांक 3 जून रोजी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या शिफारशीवरून नियुक्ती करण्यात आली आहे. यात सोशल मीडियाच्या तालुका उपप्रमुखपदी दादासाहेब खरात आणि सचिन पंडित या दोघांची  तर सोशल मीडियाच्या तलवाडा सर्कल प्रमुखपदी पिंटू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.                 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, जिल्हा संपर्क नेते अरविंद जाधव यांच्या आदेशान्वये आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक सभापती युधाजित पंडित यांच्या शिफारशीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी गेवराई तालुका शिवसेना सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्या आहेत. युवानेते रोहित पंडित आणि पं स सभापती अभयसिंह पंडित यांच्या...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शरद पवारांनी केली यांची नियुक्ती..

Image
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शेख महेबूब यांची नियुक्ती करून शरद पवार यांनी सामान्य कार्यकर्त्याला दिली संधी : बीड जिल्ह्यातील प्रस्थापित युवानेत्यांना धक्का =========      लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत मोठे फेर बदल करायला सुरुवात केली आहे. याचे संकेत पक्षप्रमुख शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. युवकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी युवक अध्यक्ष हे त्यांच्यासाठी, जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद असते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील शेख महेबुब या सामान्य मुस्लिम कुटुंबातील चळवळीच्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी विराजमान केले आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का देऊन, एक प्रकारे शरद पवारांनी आपला पुढील राजकीय संदेश देण्याचे काम केले आहे.  एमआयएमचे प्रमुख खा असोद्दीन ओवेसी आणि  बहुजन चळवळीतील नेते प्रकाशराव आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्...

देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करणार....

Image
मराठवाड्यातील आठही खासदार शिवसेना-भाजप युतीचे विजयी करून मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करणारच             ----- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मराठवाड्यातील आठही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणणे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न याच वेळी आम्ही पूर्ण केले असते, परंतु औरंगाबादचे युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे अवघ्या काही मतांनी पराभूत झाल्याने, 8 पैकी 7 जागेवर युतीचे खासदार विजयी झाले आहेत. परंतु पुढच्या वेळी 8 ही खासदार भाजप-शिवसेना युतीचे निवडून आणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार. असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  परळी येथील गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला आहे. याप्रसंगी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याचे पालक मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह भाजपा खासदार, आमदार तसेच शिवसेना-भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करायला तयार

Image
राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडणारच -- देवेंद्र फडणवीस ========== परळी ( मराठवाडा )-- मराठवाड्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पाण्याची ही स्थिती गंभीर आहे. आज प्रत्येक गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून जनावरांसाठी ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने छावण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत धरणातले पाणी पाइप लाईनद्वारे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन बीड जिल्ह्यासह मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यासाठी हजारो कोटी रुपये लागतील. वेळ आल्यास राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण मराठवाड्याचा पाणीप्रश्न आम्ही सोडणारच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ गडावरून मराठवाड्यातील जनतेला दिला आहे. परळी येथील गोपीनाथ गडावर केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अ...

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....

Image
पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठे पाण्याचे धरणं आणि सत्ता देणाऱ्या बीड जिल्ह्यात मात्र पाण्याचे रिकामे टँकर ? ==================== शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर.... ====================          महाराष्ट्राच्या राजकारणात विकास पुरुष शंकरराव चव्हाण यांच्यानंतर सर्वाधिक टिकून कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन आणि त्यांचे मानसपुत्र समजले जाणारे शरद पवार यांनी आज पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशात राजकारण केले. गेल्या तीस ते चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासात एक वेळेसही पराभूत न झालेले शरद पवार बारामतीत केलेल्या विकासकामांमुळे राज्यात परिचित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला नेता असूनही, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्याने ते आपल्यासाठी काहीतरी नक्कीच ठोस काम करतील. तसेच शेतकऱ्यांविषयी आणि शेती विषयी जाणीव असल्याने निश्चितपणे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि विशेषतः मराठवाड्यात पाण्यासाठी ते काम करून, येथील शेतीला पुनर्जीवित करून शेतकऱ्या...

शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी कोणाचे विजयाबद्दल मानले आभार ?

Image
गेवराई मतदारसंघातून प्रीतमताईंना मोठे मताधिक्य देऊन शिवसैनिक व मतदारांनी शब्द पाळला -- बदामराव पंडित   ==================== धोंडराईत जाऊन मानले मतदारांचे आभार =================== गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यात जातीपातीचे राजकारण करण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, सामाजिक सलोखा कायम ठेवत गेवराई मतदारसंघातील मतदारांनी व शिवसैनिकांनी शब्द पाळून प्रीतमताई मुंडे यांना मोठे माताधिक्य दिले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी म्हटले आहे.              गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे दि 31 मे रोजी जाऊन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मतदारांचे व शिवसैनिकांचे जाहीर आभार मानले आहेत. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बदामराव पंडित यांनी जयंती निमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष आजमखान पठाण, शिवसेना तालुकाउपप्रमुख दिनकर शिंद...

लोकसभेचे मतदान होताच पवारांना हादरा

Image
लोकसभेचे मतदान होताच आ लक्ष्मणराव पवारांना हादरा  सेलूच्या उपसरपंचासह 5 सदस्यांचा शिवसेनेत जाहीर  प्रवेश ==================== टाकरवन मधील मुस्लिम युवकही  शिवसेनेत दाखल ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होताच, गेवराई तालुक्यातील सेलू ग्रामपंचायतचे भाजपा उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी आ लक्ष्मणराव पवार यांना सोडचिठ्ठी देवून बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यासोबतच टाकरवन येथील असंख्य मुस्लीम युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून, सर्वांना शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले आहे.              राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात युतीचा उमेदवार डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी स्वतःला झोकून देत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी प्रचारात सक्रिय भाग घेतला होता. लोकसभेचे मतदान होताच बदामराव पंडित य...

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

Image
अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन करून दाभाडे परिवाराने मराठा समाजाला घालून दिला नवा आदर्श ==================== प्रत्येक आत्मा पवित्रच ; मग निधनानंतर सुतक का पाळायचे?  ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई येथील सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित  मुला-मुलींनी अंत्यविधी करून, तिसऱ्याच दिवशी दहावा, तेरावा व गंगा पूजनाचा कार्यक्रम एकत्र करत मराठा समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थित सर्व नातेवाईकांनी कौतुक करून  मराठा समाजातील प्रत्येकाने हा आदर्श घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या आहेत.           याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांचे दि 28 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दि 29 मार्च रोजी चिंतेश्वर मंदिर परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दहावा, तेरावा आणि गंगा पूजनाच्या वेगवेगळ्या करण्यात येणाऱ्या विधीमुळे नातेवाईक व मित्र परि...

ना पंकजाताई मुंडे यांची किमया भारी लक्ष्मणराव पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत

Image
पंकजाताई मुंडे यांनी जादूची कांडी फिरवली लक्ष्मण पवार - बदामराव पंडित एकाच गाडीत ==================== कार्यकर्त्यांचे मात्र अद्यापही मनोमिलन नाही ==================== बीड ( प्रतिनिधी ) पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  जादूची कांडी फिरवली असून, गेवराईत एकमेकांविरुद्ध लढलेले भाजप आ लक्ष्मणराव पवार आणि शिवसेना नेते बदामराव पंडित या दोघांनाही एकाच गाडीत बसवून युतीच्या उमेदवार प्रीतमताई मुंडे या आपल्या भगिणीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आपली राजकिय किमया दाखवून दिली आहे.             लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे राजकीय जादूची कांडी असल्याची चर्चा नेहमीच कोणत्याही आलेल्या निवडणुकीमध्ये ऐकायला मिळायची. परंतु हीच जादूची कांडी आता त्यांची कन्या पालक मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात फिरवायला सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणराव पवार आणि बदामराव पंडित हे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले होते. या दोघांमधून विस्तूही आडवा जात नाही असे चित्र भासत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रा...

मोहनराव जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे युतीची ताकद वाढली -- बदामराव पंडित

Image
मोहनराव जगताप यांच्या प्रवेशामुळे युतीची ताकद वाढल्याने प्रीतमताई मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार -- बदामराव पंडित ========== ========== गेवराई ( प्रतिनिधी ) छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांच्या भाजपा प्रवेशामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची ताकत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत यामुळे डॉ प्रीतमताई मुंडे यांचा विजय मोठ्या मताधिक्क्याने होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केला आहे.             बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना रासप रिपाई या माहितीच्या उमेदवार डॉ प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी धडाडीने प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसापासून तालखेड सर्कलमधील प्रत्येक गावांत जाऊन बदामराव पंडित हे मतदारांच्या भेटी घेऊन, डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदान मागत आहेत. दि 28 मार्च रोजी खेर्डा, वारोळा, बाराभाई तांडा, हरकी निमगाव, राम पिंपळगाव, मंगरूळ नंबर 1, सावरगाव आदि गावातील मतदारांच्या...

रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते

Image
रखरखत्या उन्हात घरोघरी जाऊन युधाजित पंडित यांनी डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या विजयासाठी मागितली मते ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - रासप - रिपाई महायुतीच्या उमेदवार डाॅ. प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या विजयासाठी  जि प सभापती तथा शिवसेनेचे बीड जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांनी रखरखत्या उन्हात मतदारांच्या घरोघरी जाऊन मते मागितली आहेत.             शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी युतीचे उमेदवार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारात आघाडी घेतली असतानाच आता बीड जिल्हा शिवसेना समन्वयक तथा जि प सभापती युधाजित पंडित यांनीही प्रचारात उडी घेतली आहे. दि 28 मार्च रोजी गेवराई तालुक्यातील आतंरवाली, मिरगाव, पांढरी, भोगलगाव, बोरगाव थडी, राहेरी आधी गावात जाऊन सभापती युधाजित पंडित यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना युधाजित पंडित म्हणाले की, पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि खा प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक विकास योजनेसाठी भरभरू...

कोठेही तडजोड करू पण गेवराईत बदामराव पंडितच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव

Image
युतीची राज्यात कोठेही तडजोड करू पण.. गेवराईत बदामराव पंडित हेच शिवसेनेचे आमदार होतील -- आनंदराव जाधव ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वप्रथम गेवराईतून बदामराव पंडित यांना शिवसेनेचा आमदार करून नामदार  करण्याचा राज्यात सर्वप्रथम शब्द दिला आहे. त्यामुळे राज्यात युतीची कोठेही तडजोड करू, पण बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघ शिवसेनेचाच राहील आणि बदामराव पंडित हेच शिवसेनेचे प्रचंड मताने आमदार होतील असा दृढ विश्वास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटन मजबूत तिचा आढावा घेण्यासाठी गेवराई येथे दिनांक 18 मार्च रोजी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांची व्यापक बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते बैठकीस माजी राज्यमंत्री बदामराव पंडित जिल्हाप्रमुख  कुंडलिक खांडे सभापती अभयसिंह पंडित युवा नेते रोहित पंडित माजी सभापती पंढरीनाथ लगड जि प सदस्य युवराज डोंगरे गटनेते बापू...