शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही - बदामराव पंडित
उसाचे पैसे कारखान्याकडे दाबून ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही -- बदामराव पंडित ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या उसाचे पेमेंट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जय भवानी कारखान्याने अद्यापही दिलेले नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या परतीच्या ठेवी परत केलेल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांचे पैसे अडवून त्यांचा खोटा पुळका दाखवत मोर्चा काढणे म्हणजे हे विजयसिंह पंडित यांचे शेतकऱ्यांविषयी पुतनामावशीचे प्रेम असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा द्या, सोयाबीन, फळबाग आणि कांदा उत्पादकांना पिक विमा नुकसान भरपाई द्या. आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विजयसिंह पंडित हे दिनांक 29 जुलै रोजी धडक मोर्चा काढत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री