जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा -- बदामराव पंडित ==================== गेवराईतील शिवसेना भवनातून पुन्हा संपर्क केला सुरू ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या महायुती विरुद्ध महाआघाडीच्या तुल्यबळ लढतीत, भल्याभल्यांचा दारुण पराभव झाला आहे. आपण तर लोकभावनेचा आदर करून अपक्ष निवडणूक लढलो आहोत. अपक्ष असूनही मतदारसंघातील लाखो लोकांनी भरभरून प्रेम दिले तर 50 हजार मतदारांनी आवल्यावर विश्वास टाकून मतदान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी खचून न जाता प्रामाणिकपणे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामाला लागावे. यापुढील काळात बीड जिल्ह्यात शिवसेना मजबूत करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी 24 तास काम करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे. यावेळी गहिवरलेल्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे बळ दिले आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने लोकभावनेचा आदर करत शिवसेना नेते माजी राज
Posts
Showing posts from October, 2019