जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी कामाला लागा -- बदामराव पंडित ==================== गेवराईतील शिवसेना भवनातून पुन्हा संपर्क केला सुरू ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या महायुती विरुद्ध महाआघाडीच्या तुल्यबळ लढतीत, भल्याभल्यांचा दारुण पराभव झाला आहे. आपण तर लोकभावनेचा आदर करून अपक्ष निवडणूक लढलो आहोत. अपक्ष असूनही मतदारसंघातील लाखो लोकांनी भरभरून प्रेम दिले तर 50 हजार मतदारांनी आवल्यावर विश्वास टाकून मतदान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी खचून न जाता प्रामाणिकपणे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामाला लागावे. यापुढील काळात बीड जिल्ह्यात शिवसेना मजबूत करून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी 24 तास काम करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहे. यावेळी गहिवरलेल्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे बळ दिले आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने लोकभावनेचा ...
Popular posts from this blog
शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?
शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ? भाजप-शिवसेनेकडून सावध पवित्रा ==================== मुंबई ( प्रतिनिधी ) बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून बजरंग सोनवणे या नवख्या तरुणाला उमेदवारी जाहीर केली असली तरी हा भाजप-शिवसेना युतीला चकवा देण्यासाठी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला असून, राजकीय धक्कातंत्राचा वापर करून, उद्या जिल्ह्यातील अभ्यासू नेतृत्व प्रदेश सरचिटणीस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशसरचिटनिस माजी आ अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी मिळेल हा बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षा आणि विश्वास होता. विशेष म्हणजे दि 13 मार्च रोज खुद्द अमरसिंह पंडित यांनी भरगच्च पत्रकार परिषद घेऊन आपण लोकसभेसाठी इच्छूक असून राष्ट्रवाडीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत देऊन, पक्ष, गट, तट सोडून ...
वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला
वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निरोगी व पोषणयुक्त आहार गरजेचा... सोयगाव( प्रतिनिधी ) गरोदर पणात वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेने निरोगी पोषणयुक्त आहात गरजेचा आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ विद्या पवार कंक्राळा येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी एकात्मिक बालविकास योजना व संजय शहापुरकर यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा येथे महिला व किशोरवयीन युवती यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी बोलतांना डॉ विद्या पवार यांनी सांगितले की मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवे असते गर्भवती राहिल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब व रक्त तपासणी करून वेळेवर लसीकरण करावे असे सांगितले या नतर संजय शहापुरकर यानी सांगितले की कुपोषण चा उगम थांब वन्या साठी गर्भवती महिला सशक्त असणे गरजेचे आहे त्या साठी दर महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या नंतर या महिलाना ...

Comments
Post a Comment