एकदाचा पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका -- उद्धव ठाकरे
===================
मुंबई ---- जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. आता केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारकडे पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोक आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे असही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता, मग अधिकारी नेमके काय करत होते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Comments
Post a Comment